Friday, May 20, 2011

भरून आलं आभाळ ...

भरून आलं आभाळ ...
 
काल दुपारी अचानक आभाळ भरून आलं.
मातीचा मृद गंध मनामध्ये भरून गेलं
पाऊस सुद्धा थोडा थोडा तेव्हा पडत होता
मनालाही तेवढाच आधार पुरेसा होता
काय माहिती कसे आहे ,पण पावसाचे आणि आठवणींचे नाते मात्र जुने आहे
 
तेव्हा सुद्धा आभाळ भरून आलं होत
पाऊस तिला बिलगला तेव्हा मन वेड झाल होत
पावसाचा त्या वेळी हेवा वाटला होता
पण छत्री तिला देऊन मी मोका साधला होता
काय माहिती कस आहे पण पावसाचे आणि छत्रीचे नात सुद्धा जुनं आहे
 
छत्री परत देताना ती रुमाल विसरली होती
मी रुमाल परत करताना सोबत चहा प्यायली होती
चहा पिताना म्हणली आता नंतरचा चहा मी देणार
यातच कळला मला, तिने मला दिला होता होकार
काय माहिती काय आहे पण चहाचे आणि मैत्रीचे नाते मात्र जुने आहे
 
चहा पिताना एकदा म्हणली तू खूप छान आहेस
तुझे वागणे सुद्धा आरशासारखे लखलखीत आहे
माझ्या वडिलांना  सुद्धा असाच  हवाय जावई
चालेल पुण्यातला किंवा चालेल सुद्धा मुंबई
काय माहिती काय आहे पण मुंबई पुण्याचा जावई सासर्याना नेहमीच  हवा आहे
 
खूप दिवस प्यालो चहा पण आमची गाडी मात्र जाईना पुढे
काय विचारू कसे विचारू ,जाईना  पुढे  आमचे घोडे
एक दिवस धीर करून तिला विचारीन म्हणले
तर तीच आधी म्हणाली तुझ्यासारखे मित्र असतात थोडे
काय माहिती काय आहे ,पण तुझे माझे नाते मात्र वेगळे आहे
 
काल मी पहिला आहे एक मुलगा
आई वडिलांना सुद्धा तो पसंत आहे बर का
मला पण वाटतोय नवरा म्हणुन बरा
नोकरी आहे कायम ,घर आणि पैसा .
काय माहित काय आहे पण ही आपली शेवटची भेट आहे
 
अजून मला आठवतेय ती भेट
अजून मला आठवतोय तो पाऊस
तेव्हा सुद्धा तो पडताच होता
माझ्या डोळ्यातले अश्रू स्वतःत मिसळत होता
काय माहिती काय आहे पण पावसाचे आणि दुःखाचे नाते मात्र जुने आहे .
 
सोनाली जोशी लिखितकर  .
 
 
 
 
 
 
 

संधिकाल

संधिकाल
संध्याकाळ पाहताना कसं वाटत उदास ..
प्रत्येक संधी होताना ,अस काय होत मनास
एकटेच पाहतो जेव्हा  ,घरट्यात परतणारे पक्षी
एकलकोंड्या आभाळावर सुद्धा उमटते काही काल नक्षी 
मन होत वेडं,  काहीतरी होतं खोल खोल आत
काय माहित  पण ,संध्येच्या  उदरात एक रहस्य दडलंय खास  
सोनाली
 

सहजच

सहजच
रात्र घनभोर अशी , तुज आठवताना
चंद्र ही आला , माझ्या सोबतीला
गार वारा थिजवतो ,काळीज माझे
पाहून शशी मग ,पांघरतो त्याचे चांदणे .
गीत मन भावन ऐकताना सुरंगी
चित्त माझे बनून गेले नटरंगी

भेट

भेट
काय लिहू सखये तुला आज तुझी आठवण आली
वाटले होते भेटावे एकदा तुला पण कामे माझी आडवी आली
जरी दूर देशी असलो तरी येतो तुझ्या देशी भेटण्याला
भेट झाली नाही तुझी म्हणुन काय झाले ?
तुझ्या गावीचा मी झेलतो अंगावर वारा
त्या वाऱ्यालाच  पाठवीन मी माझे मनोगत
लिहीन कधीतरी एकदा मी सुद्धा मेघ दूत
सोनाली लिखितकर