तुझ्या येण्यान होतं
मन बावरं बावरं,
जशी वाऱ्यावर जाते
उडुनी सावर सावर ...
तुझ्या बोलण्याचा गुंजारव
मी होते कमला पंकज,
स्पर्श होइल कधी तुझा
आधीच होते लाजाळूच पान.....
पाहशील मला चोरुनी
म्हणुनी आधी मिटले नयन ,
स्वप्नात कवळशील म्हणुनी
निद्राही दिली सोडून ......
तू आलास भेटाया
तर जाशी एकटीला सोडून,
म्हणुनी भेटत नाही तुला
राहते मनातच केवळ तुझे ध्यान ........
सोनाली जोशी लिखितकर
No comments:
Post a Comment